एकूण पृष्ठदृश्ये
सोमवार, ३० डिसेंबर, २०१९
CIBIL SCORE विषयी थोडेसे
शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९
आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे
बुधवार, २५ डिसेंबर, २०१९
देवमाणूस
रविवार, २२ डिसेंबर, २०१९
मी म्हणजे कोण?
रिऍलिटी लेखक मयूर जोशी
पोर्टेट फोटो ग्राफी टिप्स मयूर जोशी
गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९
PF चे फायदे
गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९
दोन महापुरुषांची भेट
करुणा सागर गौतम बुद्ध
दोन महापुरुष
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९
सिंहच जंगलाचा राजा का?
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
व्यवहारज्ञानाचे धडे
एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापा-यानेही ऐकली होती.
तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास आला. प्रवचन सुरु झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते.
काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले,
*''या जगात जितके प्राणी आहेत. त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो.''*
ही गोष्ट व्यापा-याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली.
त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली. मुलाने त्या गायीला हाकलण्यासाठी लाकूड उचलले पण त्याच्या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.
मग भेदभाव का मानायचा?
ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्यापारी तेथे आले त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले,
'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प बसून का आहेस?
आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला'' तेव्हा व्यापारी म्हणाले,''मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत एकसारखे करायची नसते.''
तात्पर्य :-
सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते.
सोमवार, २९ जुलै, २०१९
श्रद्धा
एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वतःला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.
प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का ?
वि. : हो निश्चितच सर..
प्रो. : देव हा चांगला आहे?
वि. : हो सर
प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे ?
वि. : हो सर अर्थातच ..
प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही ? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.'
प्रोफेसर पुढे बोलू लागले.
प्रो. : राक्षस चांगले आहेत ?
वि. : नाही सर ..
प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?
वि. : हो सर...
प्रो. : दुष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?
वि. : नाही सर ..
प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?
वि. : हो सर...
प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'
(विद्यार्थी शांत होता)
प्रोफेसर पुन्हा म्हणाले.
प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तू कधी देवाला पाहीलेस?
वि. : नाही सर ...
प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहिलीस ? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान प्राप्त झाले आहे?
वि. : नाही सर... असे काहीही नाही.
प्रो. : मग निरीक्षणार्थ, परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तू उत्तर काय देशील?
वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.
प्रो. : हो यस, श्रद्धा आणि इथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.
वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का?
प्रो. : अवश्य ...
वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .
प्रो. : हो आहे ना.
वि. : आणि शीतलता?
प्रो. : हो अर्थातच ...
वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शून्य डिग्रीच्या २७३ डिग्री खाली जातो आणि त्या तापमानाला 'नो हीट' तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.'
(वर्ग लक्षपूर्वक ऐकत होता)
वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले.
ते अस्तित्वात आहे ?
प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?
वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .
प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.
वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैत तत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.
विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .
विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ...
मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.
सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..
प्रो. : हो मी मानतो . उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.
वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली ? नाही. मीही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ....
(सर्व वर्गात हशा पिकला)
सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहिलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?
प्रो. : वेलss त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)
वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा अभाव दुसरे काही नाही....
( सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या )
पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो मने प्रज्वलित केली . करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी अग्नी पंख ( 'Wings of Fire' ) दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...
रविवार, २८ जुलै, २०१९
Quick heal एक जिद्द, चिकाटीची कहाणी
*Quikheal Antivirus चार मालक फक्त १०वी पास...!!*
नाव *कैलास काटकर. गाव मूळचं सातारा जिल्ह्यातलं *रहिमतपूर*.
राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये.
*वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब*
नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.
*कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच.*
*घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला इंग्लिश मिडीयम शाळेत घातलेलं.*
*पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला.*
*पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.*
तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती.
*वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती.* त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.
*काही तरी करू असा आत्मविश्वास होता.* दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.
एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, *एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती.*
*कैलासने आयुष्यात कधी कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता.* त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने *मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली.*
*अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.*
नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत *स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं.* सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला.
त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले.
*एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, *कोणी तरी सांगितलं तो काॅम्म्यूटर आहे,*
कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे.
*पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.*
*नव्वदच्या दशकातला तो काळ.*
कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता.
त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या.
कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे.
*कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.*
*एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले.*
*टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला.*
*कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या.*
पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.
*स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही.*
धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी *मॉडर्न कॉलेजमध्ये* कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.
*त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात.*
*मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.*
या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे.
*लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात काय करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.*
त्यांच्या धाकट्या भावाने संजयने *सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.*
*त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार.*
त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला.
*दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. *त्याला नाव देण्यात आलं "Quick heal"*
*संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,* पकेजिंग तयार केलं.
कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले.
*कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.*
त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत.
*अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं.*
*क्विक हिल अँटी व्हायरस* बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.
अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले.
*पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली.*
*मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.*
*तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस*
*उघडलेले आहेत.*
*आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल.*
*आणि*
*हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं.*
👍👍