एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

माणसं ओळखायला शिकलं पाहिजे

🙏एक निर्विवाद सत्य🙏

अति गोड बोलणारी,अति लवून नमस्कार करणारी,पाय पडणारी,अति स्तुती करणारी,अतिआदर सत्कार करणारी,विश्वास संपादन करण्याकरीता कोणत्याही स्तराला जाणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक,आतल्या गाठीची, लबाड,बेरकी,संधीसाधू व विश्वासघातकी असतात.
तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात..!
यालाच,"खाली मुंडी अन पाताळधुंडी"असे म्हणतात..!

याउलट,जी माणसं तोंडावरच मोठ्याने,कडवट,खवट,अपमानकारक,टिकात्मक,जहरी,फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांच अंतर्मन "वरच्या" प्रवृत्तींपेक्षा नक्कीच चांगल असतंं,विश्वासघात करणं,फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं.ती खरच मनमोकळी व विश्वासु असतात..!

म्हणून,जिवनांत आपण बाकी काही शिको अथवा ना शिको,पण "माणसं" ओळखायला नक्की शिकलंच पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा