राज्यात कृषि हवामानातील विविधतेमुळे अनेक प्रकारची फळपिके घेणे शक्य आहे. तसेच क्षेत्र विस्तारासाठी वाव असल्या कारणास्तव या योजनेचा समावेश केला गेला आहे.
उद्देश –
१) प्रत्येक विभागातील हवामानानुसार चांगल्या प्रकारे येणा-या फळपिकाखालील क्षेत्र विस्तार करणे.
२) फळपिकांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनावर भर देणे.
३) जुन्या दुर्लक्षीत फळबागांचे उत्पादन वाढीसाठी अत्यावश्यक निविष्ठांच्या पुरवठा करणे.
४) फळांचे उत्पादन वाढीसाठी शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.
५) वनस्पती आरोग्य चिकित्सालय, मुलद्रव्ये तपासणी प्रयोगशाळा व रोगाचे पुर्वानुमान केंद्रस्थापनेसाठी अर्थसहाय्य देणे.
६) अभियानातील लागवडी समुह पध्दतीने करतांना परीसर ही संकल्पना लक्षात घ्यावी.
या योजना चिकू, डाळींब, कागदी लिंबू या फळपिकांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमध्ये बहुवर्षीय द्राक्ष पिक व वार्षिक द्विवार्षिक केळी पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
अनुदान –
अ) बहुवार्षीक – द्राक्ष क्षेत्र विस्तार याकरीता खर्चाच्या ७५ टक्के किंवा कमाल रुपये २२५०० प्रती हेक्टर अर्थसहाय्य राहील.
ब) वार्षिक / द्विवार्षिक – केळी क्षेत्रविस्तार याकरीता खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये १५०००/ अर्थसहाय्य देय राहील.
क) अर्थसहाय्य तिन वर्षामध्ये ५०.३०.२० याप्रमाणे विभागून देण्यात येईल.
ड) तसे द्राक्ष व केळी या दोनही पिकांकरीता क्षेत्रमर्यादा ४.०० हेक्टरपर्यत राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा