१) नियुक्ती - महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ नुसार जिल्हाधिकारी / उपजिल्हाधिकारी / प्रांत अधिकारी करतो.
२) वंशपरंपरागत पाटिलकी व वतनदारी बंद - कायदा १९६२ हा कायदा लागु झाला - १ जाने. १९६३
३) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम - १९६७, लागू - ५ जून १९६८ हा कायदा मुंबई शहर व मुंबई उपनगरास लागू नाही.
४) महाराष्ट्र पोलीस नियमावली - १९६८
पात्रता -
१) वयोमर्यादा - २५ ते ४५ वर्षे
२) मुदत - ५ वर्षांसाठी व तेवढ्याच कालावधीसाठी दुस-यांदा परंतु ६० वर्षांनंतर नेमणुक करता येत नाही.
३) शिक्षण :- कमीत कमी ६ वी, अपवादात्मक – ४ थी, ४ थी पेक्षा कमी शिक्षण असल्यास नेमणुकीसाठी आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते.
४) गावचा रहिवाशी आसावा.
५) शारिरीक दृष्ट्या पात्र असावा
६) वर्तणूक चांगली असावी
७) मागासवर्गीयांना प्राधान्य दिले जाते.
* वेतन ८०० रु.
* पोलीस पाटलाच्या गैरहजेरीत काम पाहतो – शेजारच्या गावचा पोलिस पाटील
* पोलीस पाटलास किरकोळ रजा देण्याचे अधिकार (१२ दिवसांची) तहसिलदार
* पोलीस पाटलास पुर्ण कालीन नोकरी करता येत नाही. व्यवसाय करता येतो. इतर सरकारी नोकरांप्रमाणे सवलती मिळत नाही. परंतु अटी पुर्ण केल्यास मुलांना मोफत शिक्षण मिळते.
कार्ये –
१) गावात बंदोबस्त ठेवून गुन्ह्याला आळा घालणे
२) वरिष्ठ अधिका-यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे
३) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तहसिलदारांना माहिती देणे
४) साथीच्या रोगांचा अहवाल तयार करणे
५) गावांत संशयास्पद मृत्यु झाल्यास तहसिलदार व पोलीस अधिका-यास कळविणे, मादक पदार्थाची माहिती देणे.
६) विना परवाना असलेले शस्त्र काढून घेणे. त्याचा वरिष्ठ अधिका-यास कळविणे, मादक पदार्थांची माहिती देणे.
७) चौकशीत पोलीसांना मदत करणे.
८) कोतवालावर नियंत्रण ठेवणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा