एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

मनुस्मृती आणि कायदा

⛓ *मनुस्मृती 📕🔥, भारतीय संविधान 🇮🇳📓आणि स्ञी👸👮‍♀*

👉भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हीन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले.
👉स्त्रियांच्या या अवनतीस *ब्राम्हणवादी व्यवस्था* कारणीभूत आहे.
👉स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य *भगवान बुध्द, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही.
👉काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी *प्राचीन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही.*
👉प्राचीन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढील आलेखावरुन दिसून येईल.

💥१.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आपस्तंभ धर्मसुत्र ६-११ नुसार एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना स्त्री समोर आली असेल तर त्याने वेद वाचणे थांबवावे असे लिहीले आहे.

👉महात्मा फुलेंनी *१ जानेवारी १८४८* रोजी *मुलींसाठी देशात पुण्यात पहिली शाळा* काढून स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. *सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात.* डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या *कलम २९* नुसार *प्रत्येक स्त्रीस शिक्षणाचा मुलभूत अधिकार* बहाल केला.

💥२.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार  स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारुन ती स्वातंत्र्यास लायक नाही असे सांगितले.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम १४* नुसार  *देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले.* एवढेच नव्हे तर घटनेच्या *कलम ३१ (घ)* नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही *समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार* दिला.

💥३.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार पतीला पत्नीची विक्री करण्याची मुभा देण्यात आले. याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील द्रोपदीला जुगारात हरण्याचे आहे.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम २३(१)* नुसार  *स्त्री-पुरुषांचा व्यापार व विक्री करण्यास मनाई* केली आहे.

💥४.मनुस्मृतील श्लोक क्रमांक २-६६ नुसार स्त्री ही अमंगल ठरविण्यात आले असून तिला धार्मिक विधी अथवा मंत्र म्हणता येत नाही. मनुस्मृतील श्लोक क्रमांक १६-३६-३७ नुसार  ती जर मंत्र म्हणत असेल तर नरकात जाते.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम २५* नुसार *धर्म स्वातंत्र्याचा व धार्मिक विधीत सहभागी होण्याचा स्त्री-पुरुषांना समान अधिकार* आहे.

💥५.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४८ नुसार  स्त्रीला नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यास मनाई केली आहे. नवरा कसाही असला तरी तिने नवऱ्यासोबत राहावे असे तिच्यावर बंधन टाकले. पुरुषावर मात्र असे कोणतेही बंधन टाकले नाही.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम ६ अनुसूची ३ (झ)* नुसार नवरा जर अन्यायी असेल तर त्याच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी *घटस्फोट घेण्याचा अधिकार* दिला आहे.

💥६.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-४१६ नुसार पत्नीला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नाही. तिने जरी स्वकष्टाने संपत्ती मिळवली असली तरीही त्यात तिचा हक्क नाही.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम ३०० (क)* नुसार  *स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कापासून वंचित करता येत नाही.* तसेच बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाच्या आधारावर जो कायदा तयार करण्यात आला, त्यानूसार *स्त्रीला कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क* देण्यात आला आहे.

💥७.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ८-२९९ नुसार  स्त्रिला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला हक्क देण्यात आला. तसेच श्लोक क्रमांक ११-६७ नुसार  स्त्री हत्त्या झाली असेल तर मद्यपानाच्या अपराधाएवढा क्षुल्लक गुन्हा ठरविण्यात आला. एवढेच नव्हे तर, *तुलसीदास* यांनी रामचरित मानस मध्ये म्हटले आहे की, *'ढोल गवाँर शुद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी।’*

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२)* नुसार स्त्रीला मारहान करणे व स्त्रीची हत्या करणे फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय स्त्रीला त्रास होवू नये म्हणून *इंडियन माईन्स अॅक्ट १९४६* ची निर्मिती करुन *स्त्री कामगारांना खाणीत, जमिनीच्या आत काम करण्यास व रात्रपाळीस बंदी घातली.* तसेच *माईन्स मॅटर्निटी बेनेफिट अॅक्ट* तयार करुन *स्त्रियांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस* केली. *पुढे घटनेने हा कायदा देशातील सर्व स्त्रियांसाठी लागू केला.* त्याच प्रमाणे घटनेच्या *कलम ४२* नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी व सुरक्षित व्यवस्था देण्यात यावी असे बंधन मालकावर टाकण्यात आले.

💥८.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४७ नुसार कुटुंबातील कोणत्याही स्त्रीला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम १४* नुसार  स्त्री किंवा पुरुषाला समान अधिकार असल्यामुळे *स्त्रीला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार* दिला आहे. एवढेच नव्हे तर घटनेच्या *कलम ३९ (क)* नुसार *उपजिविकेचे पर्याप्त साधन मिळविण्याचा अधिकार* दिला. तसेच घटनेच्या *कलम ३२५* नुसार बाबासाहेबांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी *मतदानाचा अधिकार* दिला. या महत्वपुर्ण अधिकारांमुळे लोकशाहीतील सर्वश्रेष्ट असं शस्त्र स्त्रियांच्या हातात देवून व त्यांना *सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर* करुन बाबासाहेबांनी स्त्रियांवर अनंत उपकार केले आहे.

💥९.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९.१६ नुसार स्त्रीच्या बाबतीत असे म्हटले की परमेश्वराने जन्मताच तिच्यात अत्यंत विघातक दुर्गुण घातले आहेत. श्रीकृष्णाने भगवतगिता श्लोक क्रमांक ९.३२ नुसार स्त्रियांना पापयोनी म्हटले आहे.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२)* नुसार स्त्रियांची मानहानी करणे व *कलम १४* नुसार लिंगभेद करण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेच्या *कलम ३९ (क)* नुसार कायद्याने न्याय देतांना स्त्री पुरुष असा लिंगभेद करता येत नाही.

💥१०.विधवा स्त्रीचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्ञीला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे ( मध्यप्रदेशात होळीच्या दिवशी शुद्र स्त्रीला नग्न नाचविण्याची प्रथा आहे.) इत्यादी स्त्रियांना हिनत्व आणणाऱ्या कुप्रथा स्त्रियांवर हिंदू धर्माने लादल्या.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम ५१ (ड)* नुसार  *स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणाऱ्या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आणली.*

👉 *हिंदु धर्मातील ब्राम्हणी व्यवस्थेतील मनुच्या कायद्याने व इतर धर्मग्रंथाने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले.* म्हणूनच महात्मा फुल्यांनी, *‘मनुस्मृती जाळली पाहिजे’* असे जळजळीत उद्गार काढले होते. बाबासाहेबांनी आपल्या गुरुची आज्ञा समजून प्रत्यक्षात *दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी हा काळा कायदा जाळला.*  ते मनुस्मृती जाळून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी *समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायावर आधारित भारतीय घटना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला अर्पण करुन  तिची अंमलबजावणी दिनांक २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.*
👉आज फुले-आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वामुळेच भारतीय स्त्री देशाच्या प्रधानमंञी, राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत. तेव्हा *भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे द्वार उघडून देणाऱ्या या महामानवांसमोर समस्त स्त्रियांनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हायलाच पाहिजे.*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा