एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

आयुष्याचा मूलमंत्र

एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे

---'तरुणांसाठी :--

1) अन्य जाती-धर्मांवर टिका
करत वेळ वाया घालवू नका.
ज्या लोकात जे चांगलं असेल
त्यांच्याकडून त्या गोष्टी
आत्मसात करा.💮

2) दंगली- मारामारी करुन आपलं
नाव खराब करुण घेऊ नका.
आता लढाईचा काळ
राहिलेला नाही.💮

3) फक्त उच्च शिक्षणच तुम्हाला आणि
तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
जीवन देऊ शकतं.💮

4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
त्यांचा मागे फिरू नका
तुम्ही फक्त वेळ वाया घालवत आहात.

5) आजचा तरुण एकमेकांना मदत
करुन प्रगती करू शकतो.
त्यासाठी राजकीय पक्षाची वा
नेत्याची गरज नाही.💮

6) इंग्लिश बोलायला शिका.
हा मराठीचा अपमान नाही काळाची गरज आहे.💮

"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा